फलटण : बारामती आणि फलटण तालुक्यातील साखरवाडी या दोन प्रमुख बाजारपेठांना जोडणारी एसटी बससेवा सोमवारपासून (दि. १५) दिमतीला धावू लागली आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून, पहिल्या फेरीचे वडगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
बारामती तालुक्याचा पश्चिम भाग आणि फलटण तालुक्यातील साखरवाडी ही गावे व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यापूर्वी फलटण आगाराची बस वडगावपर्यंत सुरू होती, मात्र ती बंद झाल्याने विद्यार्थी आणि कामगारांचे हाल होत होते. ही अडचण ओळखून वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हिरवे आणि दत्तात्रय गायकवाड यांनी बारामती आगाराकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या मागणीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत मंत्र्यांनी बस सुरू करण्याचे आदेश दिले. आदेशाचे पत्र प्राप्त होताच बारामती आगाराने तातडीने नियोजन करून ही मुक्कामी बससेवा सुरू केली.
ही बस दररोज एक फेरी पूर्ण करणार असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
बसच्या पहिल्या फेरीचे आगमन झाल्यावर चालक ए. एस. पिंगळे आणि वाहक एन. पी. कुंभार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आबा भोसले, जितेंद्र पवार, नीलेश आगम, विलास बनकर, हनुमंत लोणकर, महेंद्र माने, नानासाहेब मदने यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
१. विद्यार्थी: शारदानगर, माळेगाव आणि सोमेश्वरनगर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.
२. कामगार: साखरवाडी आणि सुरवडी येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या बारामती तालुक्यातील कामगारांना मोठा आधार मिळाला आहे.
३. व्यापारी: दोन मोठ्या बाजारपेठा जोडल्या गेल्याने स्थानिक व्यापाराला गती मिळणार आहे.